पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज : आज राज्यातील काही ठिकाणी पडणार पाऊस
पंजाबराव डख यांचा
सध्या हवामानात सतत बदल होत आहे. आता भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांत आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मात्र उत्तर राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता आहे.
तसेच पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागातही थंडीची लाट येऊ शकते. आंध्रप्रदेश, तामिळनाडूचा किनारी भाग आणि अंदमान निकोबार बेटांवर पावसाची शक्यता असल्याने संबंधित भागातील जनतेला सतर्क राहण्याची गरज आहे.
असे असताना महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याने रब्बी हंगामासाठी लगबग करत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच समाधान पाहायला मिळणार आहे. मात्र इतर राज्यात शक्यता असल्याने राज्यातील शेतकरी देखील चिंताग्रस्त आहे.
दरम्यान, राज्यात सध्या थंडीचा जोर वाढत आहे. यामध्ये अजूनच वाढ होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता नाही.
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पाच ते सात तारखेपर्यंत मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पाऊस पडणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. शेतकरी बांधवांच्या मते पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असून यामुळे त्यांचा फायदा होत आहे.
मित्रांनो आज दोन नोव्हेंबर आणि उद्या तीन नोव्हेंबर रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार असले तरी देखील पाऊस पडणार नसल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत आज आणि उद्या फक्त ढगाळ वातावरण तयार होणार आहे.
पाऊस पडत नसला तरी देखील ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. दरम्यान 4 नोव्हेंबर पासून पुन्हा हवामान पूर्ववत होणार असून राज्यात दिवसा कडक ऊन आणि रात्री तीव्र थंडी जाणवणार आहे. निश्चितच, राज्यात आता रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
पंजाबराव डख यांनी देखील राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पावसाळी काळात तसेच परतीच्या पावसात झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता राहणार नाही.
निश्चितच पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरीदेखील याच पावसामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात मोठा दिलासा मिळणार असून खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून काढता येणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
स्रोत : marathi.krishijagran.com