कृषी महाराष्ट्र

दाणेदार खते पाण्यात मिसळणाऱ्या खतांवर पर्याय ठरू शकतात का ? त्याचे फायदे तोटे काय ?

दाणेदार खते पाण्यात मिसळणाऱ्या खतांवर पर्याय ठरू शकतात का ? त्याचे फायदे तोटे काय ?

 

ड्रिप इरिगेशन आले व त्यासोबत वाटर सोलुबल चे तंत्र ही आले.ज्या इस्राईल मधून हे तंत्र आले ते कंप्यूटर कण्ट्रोल फर्टिगेशन करतात.फ़िल्टर चे प्रेशर गेज वर्षातून कधीतरी पहणारे आम्ही केव्हा कंप्यूटर ऑटोमोशंन समजनार.आमच्याकडे असते ते केवळ आंधळे अनुकरण.ते पीपीएम मध्ये खते देतात आम्ही किलो मध्ये देतो.एखाद्या तंत्राची एक बाजू पाहून आम्ही एवढे वेडे होतो की त्याची दूसरी बाजू आम्हाला दुष्परिणाम दिसल्याशिवय लक्षातच येत नाही.

मित्रहो वाटर सोलुबल आपण ज्या अशास्रीय मोघम पनाने वपरतो त्यामुळे आपण अनेक समस्यान्न तोंड देत आहोत! We are facing many problems due to the non-human Mogham pages used! जादा पीपीएम मुळे PH वाढतो EC वाढतो ‘, झाड़े रेगुलर फर्टिगशन वर डिपेंडेंट बनतात, म्हणजे ख़त देने बंद केले की झाड़ लगेच कमजोर होते एकाच जागेवर खते मिळाल्यामुळे मातीत मुळांची वाढ खुंटते मुळांचा अन्न शोधन्याची प्रक्रिया थांबून जाते!! नेमाटोड , स्ट्रेस मध्ये वाढ होते व रोगाला पोषक वातावरण मिळते.एक पर्याय आहे तो म्हणजे दानेदार खते बेसल मध्ये वापरणे भिजवून नीवली करुण ड्रिप मधून सोडने

आपण जे नेहमी तक्रार करत असतो, खते अपटेक होत नाही त्याचे कारन रासायनिक ख़त असो किंवा सेंद्रिय ख़त ते कच्चे असेल तर अजिबात लागु होणार नाही ते मातीत फिक्स होते व उलट जमींन ख़राब करूँन बुरश्या व रोगन्ना आमंत्रण देते सेंद्रिय खते (शेनखत व इतर ) कुजवले की लागु होतात व् रासायनिक खतांमध्ये ह्यूमस मिसळला की त्यांचे चिलेशन होते व असे मिनरल्स मुलांद्वारे झाड़कडे पाठवले जातात या प्रक्रियेत ह्यूमस चा रोल अत्यंत महत्वपूर्ण आहे.

वाटर सोलुबल ( पाण्यात मिसळणारे ) हे ( इंस्टेंट ) लगेच लागु होण्यासाठी बनलेले आहे त्यामुळे ते नियमित थोड़े थोड़े द्यायला हवे !! शेतकरी मित्रहो ज्याप्रमाणे 4-5 दिवस उपवासी राहुन् त्या सर्व पोळ्या एकाच दिवशी खावु शकत नाही ?होय नाअगदी त्याचप्रमाने झाडाला दररोज 1 किलो ख़त द्यायला पाहिजे ते चार पांच दिवसांनी 4 किलो कसे चालेल.असो जमिनीला रासायनीक खत दिल्यामुळे उत्पन्न जास्त होते ह्या एकाच गोष्टीमुळे सर्व शेतकरी खताचा वापर करतात.जमीन खत खात नाही.उलट खतामुळे जमिनीच्या वरच्या थरात असलेले जिवाणू मरतात. दाणेदार खते

खालील थरातील जिवाणू मेलेले जिवाणू खातात.ऊर्जा निर्माण झाली की पीक होते.वारंवार रासायनिक खते दिल्यामुळे आपल्या शेतात असलेल्या जिवाणूंची संख्या कमी झाली आहे.ह्याच कारणामुळे आज पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही.म्हणून शेतकरी बंधूंना नम्र विनंती आपण रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खत व शेंदिय कार्बन वाढवणारी औषध वापर करा.ज्या प्रमाणे आपल्याला ईश्वराने हात, पाय,तोंड दिले तसे जमिनीला नाही.जमीन खत खात नाही. वारंवार रासायनिक खते दिल्यामुळे आपल्या जमिनी नापीक होत आहेत.

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top