कृषी महाराष्ट्र

‘लम्पी स्कीन’ ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये बदल !

‘लम्पी स्कीन’ ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये बदल !

 

राज्यभरात लंपी रोगाने (Lumpy disease) धुमाकूळ घातल्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून रोगाला अटकाव घालण्याच्या प्रयत्न होत आहे. यासह या आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या ठराविक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई दिली जात होती.

आता त्यात बदल करत संख्येचे निर्बंध दूर करून जितकी जनावरे ‘लम्पी स्कीन’ने दगावतील तितक्या जनावरांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ही माहिती पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग यांनी मंगळवारी (ता. 4) दिली आहे. ‘लम्पी स्कीन’ ‘लम्पी स्कीन’

लम्‍पीची साथ आल्यानंतर मृत पावलेल्या जनावरांबाबत संबंधित पशुपालकांना अर्थसाह्य देण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु जे पशुपालक (Cattle breeder) हे अल्‍प भूधारक, अत्यल्‍प भूधारक आहेत, त्‍यांनाच हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तसेच हा लाभ केवळ एका शेतकऱ्या‍साठी तीन जनावरांच्या मृत्यूपर्यंतच होता. या शासन निर्णयात आता बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार, सर्व शेतकरी (farmers) व पशुपालकांना या निर्णयाचा लाभ होईल. तसेच जनावरांच्या संख्येवर घातलेली मर्यादाही उठवण्याचा महत्त्‍व‍पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

किती मिळणार रक्कम ?

गाय किंवा म्‍हैस लम्‍पी स्कीनने मृत पावल्यास संबंधित पशुपालकास ३० हजार रुपये, ओढकाम करणारी जनावरे, जसे की बैल मृत पावला तर २५ हजार व वासरू असेल तर १६ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

जितकी जनावरे लम्पी स्कीनने दगावतील तितक्या सर्व जनावरांसाठी (animal) मदत मिळणार आहे. अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे पशुधन मृत पावलेल्या सर्व पशुपालकांना अर्थसाह्य मिळणार आहे.

श्रोत :- marathi.krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top