कृषी महाराष्ट्र

IMD Alert – राज्यात पावसाचे थैमान, आजही अतिवृष्टीचा इशारा !

IMD Alert – राज्यात पावसाचे थैमान, आजही अतिवृष्टीचा इशारा !

 

Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने (Rain) थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भागात काल रात्री मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच आजही भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबई, रायगड, पुणे, पालघर, ठाणे यासह राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसाचा इशारा असताना राज्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस

पुण्यात (Pune) सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे रस्ते जलमय झाले. यावेळी वारेही जोरदार वाहत होते. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडली. शिवाजी नगर परिसरातही 81 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सिंहगड रोड, एनआयबीएम, बीटी कवडे रोड, हडपसर, मार्केट यार्ड, कात्रज अशा अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

वास्तविक, बंगालच्या उपसागरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्यामुळे मुंबई आणि उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागात सतत पाऊस पडत आहे. सखल भागात रस्ते, घरे आणि रुग्णालयेही पाण्याखाली गेली आहेत.

ऑक्टोबरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस

विशेष म्हणजे मुंबईत ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने हा विक्रम मोडला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 86.5 पावसाची नोंद झाली आहे. IMD Alert

रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, 1988 मध्ये ऑक्टोबरमध्ये एका दिवसात पावसाची नोंद झाली होती, तर 15 ऑक्टोबरला 140.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याच वेळी, गेल्या आठवड्यात मुंबईत 24 तासांत 114 पावसाची नोंद झाली.

कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर शहर (kolhapur) परिसरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार केला आहे. असे असतानाच हवामान विभागाकडून कोल्हापूरसह 9 जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणमधील परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे. कोल्हापूर तसेच मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पावसाने चालू मोसमात जून महिन्याचा अपवाद वगळता चांगली साथ दिली होती. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नव्हती. त्यामुळे शिवारातील पीके जोमात आली होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने कोल्हापूर शहर परिसराह जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने उभ्या पिकांची पार नासाडी झाली आहे. या पावसाचा फटका सर्वाधिक सोयाबीन पिकाला बसला आहे. सोयाबीन पीक पोसले असतानाच परतीच्या पावसाने दणका दिल्याने त्याला मोड येऊ लागली आहेत.

श्रोत :- krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top